Abstract:
जुलै १९१४ च्या सुमारास महात्मा गाांधी आफ्रिकेतून भारतात परत आले आणि १९१७ मध्ये त्याांनी अहमदाबादला साबरमती आश्रमाची स्थापना केली . या आश्रमाला त्या काळी “सत्याग्रह आश्रम” असां पि म्हिलां जायचां. या आश्रमाच्या सात्विक आणि अहिंसेने प्रेरित वातावरणात रोज सांगीतमय प्रार्थना आणि भजनाचा समावेश हवा असे गाांधीजीना वाटू लागले. यासाठी त्याांनी पांडित विष्णू दिगंबर पलुस्करांना एका सात्विक कलाकाराला पाठविण्याची विनांती केली, तेव्हा पलुस्कराांनी नारायण मोरेश्वर खरे या आपल्या गुणवान, सात्विक संस्कारी आणि संगीतज्ञ पट्टशिष्याला अहमहाबादला पाठवलं आणि साबरमती नदी किनारी वसलेल्या महात्मा गांधींच्या आश्रमाने, अभिजात संगीत आणि जाज्वल्य देशभक्ती याांचा अनोखा सांगम, पांडित नारायण मोरेश्वर खरे याांच्या रुपात अनुभवला !!